संजय भोकरे, प्रतिनिधी मुंबई: महाराष्ट्र राज्य र्विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सदस्य हेमंत श्रीराम पाटील, पंकज छगन भुजबळ, श्रीमती मनीषा कायंदे, इद्रिस इलियास नाईकवाडी, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, श्रीमती चित्रा किशोर वाघ यांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.
विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात दुपारी १२ वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न झाला.
परंतु आता मात्र राज्यपाल यांनी 7 आमदारांची तातडीनं नियुक्ती करून त्यांचा शपथविधीही आचारसंहिता लागण्यापूर्वी उरकला,काही तासातच आमदारांची विधानपरिषदेवर वर्णी लागली आणि विधानसभेत शपथविधी सोहळाही पार पडला.. त्यावरून आता विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत.
विधान परिषदेसाठी 7 नवनिर्वाचित आमदारांनी पैकी 3 यात भाजप नेत्या चित्रावाघ, विक्रांत पाटील आणि बाबूसिंह राठोड यांनी शपथ घेतली,तर अजित पवारांच्या 2 राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इंद्रीय नायकवडी यांनीही शपथ घेतली , आणी शिंदेंच्या 2 शिवसेनेच्या मनिषा कायंदे आणि हेमंत पाटील यांनी शपथ घेतली.
आता विरोधकांनी व सत्ताधारी
राज्यपालं यांच्या आमदार नियुक्तीवर प्रश्न चिन्ह उभारले आहेत. सातच आमदारांची नियुक्ती का केली? उर्वरित 5 आमदारांची नियुक्ती का केली नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यपालांनाच विचारलाय. 7 आमदारांच्या नियुक्ती विरोधात याचिका कर्ते सुनील मोदी यांनी तातडीनं कोर्टात धाव घेतलीय. तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आलीय. परंतु तातडीनं सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. दरम्यान, आमदारांची यादी ही घटनाबाह्य असून राज्यपाल घटनाबाह्य काम करत असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय, तर राज्यपालांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप असीम सरोदेंनी केलाय.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण कोर्टात सुरू आहे. त्याप्रकरणाचा निकाल अद्यापही आला नाही, असे असतांना 7 आमदारांची विधान परिषदेवर नियुक्ती केल्याने विरोधकांनी आक्षेप घेतलाय. ठाकरे गटाने आता कोर्टाचेही दरवाजे ठोठावल्याने राज्यपाल नियुक्त आमदारांवरुन वाद निर्माण झालाय.